फलटण चौफेर दि ३१ मार्च २०२५
भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता विविध अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रेय, हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन, विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला.इ.स.११४९ मध्ये छेले खेडे ( पंजाब ) मधून प्रगट होऊन, भगवान श्री दत्तात्रेय यांनी एक आगळावेगळा बुद्धीला अगंम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला, २२९ वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज, अखिल विश्वामध्ये संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते, कारंजा विदर्भ, महाराष्ट्र, कर्नाटक, येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे १०० वर्षे कार्य केले, याच काळात औदुंबरवाडी, गाणगापूर, यासारखे महान तीर्थक्षेत्र तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. कलियुगात कलीच्या प्रभावाने, गुरफटलेल्या मनुष्याला, देवपूजेचा विसर पडत चाललेला आहे, धावपळीच्या जीवनात कित्येक कुळाचार, रूढी, परंपरा, काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या आहेत, त्यामुळे मनुष्य दिवसेंदिवस संसारिक व आध्यात्मिक दृष्टीने दुबळा बनत चाललेला आहे, यासाठी इ.स.१६७८ मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इ.स.१८५६ मध्ये महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे सगळ्या वेगळ्या पद्धतीने जो, जो, भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनवले, अनन्य भावाने चिंतन केल्यास, सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली, पूर्व कर्म संचिताचा, मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले, मात्र हे करताना कोणालाही कुठेही प्रचार, अथवा प्रवचने, न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले, आजही तितक्याच वेगाने, किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने लोक अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले, असून स्वामीभक्त भक्तीत वेडे झालेले आहेत.
कोणाही व्यक्तीने, श्री स्वामी सेवेची मनोभावे व श्रद्धेने केलेली भक्ती निश्चितच अल्पावधीतच त्याच फलप्राप्ती लाभते, हे अनुभवजन्य सत्य आहे.
अशाच प्रकारची मनोभावे स्वामी सेवा करण्याची इच्छा मनात ठेवून, आपल्या झोपडीवजा राहत्या घरात दर गुरुवारी, नामस्मरण जप, आरती व प्रसाद गेले १८ ते २० वर्षे, कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता सेवा करणारे, स्वामीभक्त श्री. सुरेश बाजीराव इंगळे, उर्फ भाऊ, साखर कारखान्यातून रिटायर झाल्यानंतर वडिलांचा तंबाखू विक्रीचा पारंपारिक व्यवसाय कित्येक वर्षे केला. व अचानक एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, बायपास करावी लागली, व्यवसाय बंद झाला, घरात नुसते बसून राहण्यापेक्षा मुळातच स्वामींच्या भक्तीची आवड असल्याने सुरुवातीला घरगुती स्वरूपात पत्नी व दोन लहान मुले व आसपासचे काही भाविक, यांना घेऊन ते स्वामी भक्ती करू लागले, हळूहळू महिला व पुरुषांची संख्या वाढू लागली, तसेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा कार्यक्रम ते स्वतः करू लागले, त्याचा लाभ साखरवाडी व परिसरातील लोक घेऊ लागली, त्यासाठी लागणारा सर्व किराणामाल स्वतःची परिस्थिती नसतानाही ते स्वतःच्या उधारीवर आणुन कार्यक्रम साजरा करीत, व ते पैसे वर्षभरात स्वतःच्या उत्पन्नातून फेडत, या कार्यक्रमाला बहिण भाऊ पुतणे इत्यादी, कुटुंब मोठे असल्यामुळे आवर्जून सुट्टी काढून ते येतात, भाऊ पती-पत्नी सर्वांची मनमोकळेपणाने सेवा करीत, हळूहळू गर्दी वाढू लागली, राहती जागा कमी पडू लागल्याने, भाऊंनी मठ स्थापन करण्याच्या उद्देशाने कारखाना रिटायरमेंटच्या पैशातून, साखरवाडी नजिक मुरूम रस्त्यालगत दहा गुंठे जागा घेतली, मठ स्थापन करण्याची त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, पण काही ना काही अडचणीमुळे ती पूर्ण होत नव्हती, भाऊ स्वतः नेहमी म्हणत, स्वामींचीच येथून जाण्याची इच्छा दिसत नाही, आणि मार्गही तेच दाखवणार आहेत.आज नोकरी निमित्त दोन्हीही मुले बाहेर आहेत,
संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे मार्ग सापडतो, खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो, आणि खरी कळवळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते, भगवंताने माझी आपत्ती दूर करावी, हे म्हणणे वेडेपणाचेच आहे, संकटे आपत्ती आल्यावरच आपणाला स्वामी भक्ती आठवते, आनंदी भावाने स्वामींची सेवा करीत राहिला तर त्याचे फळ निश्चितच मिळते,याचीच प्रचिती भाऊंचे राहिलेले स्वप्न पूर्णत्वास आले, व यावेळेस स्वामींच्या भजनाची आठवण आल्याशिवाय राहत नाही किती आनंदी, आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या नकळतच मला वाटले, हे गाणे भाऊंच्या बाबतीतही अगदी परफेक्ट आहे,
भाऊंनी घेतलेल्या जागेतच आज स्वामी प्रकटदिनी लोकसहभागातून अत्यंत सुंदर असे मठाचे काम पूर्ण झाले, गेल्या वर्षी मोठ्या उत्साहाने वाजत, गाजत, असंख्य भाविकांच्या उपस्थितीत, रथ, पालखी, सनई चौघडा, यांच्या गजरात, असंख्य महिला, पुरुष भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक वातावरणातून भाऊंच्या राहत्या घरापासून नवीन बांधलेल्या स्वामी मठा पर्यंत रखरखत्या उन्हात भाऊ स्वतः आनंदाने आपल्या प्रिय स्वामींच्या मार्गावर फुलांचा गालिचा तयार करण्याचे काम स्वतः केले, आज एक वर्षे पूर्ण होत आहे आनंद आणि दुःखही त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हते,स्वामी प्रकट दिनाची मठामध्ये धावपळ सुरू असून हजारो भाविक याचा लाभ घेतील, असा नियोजकांचा मानस आहे,स्वामींच्या या मठाला भाविकांनी, स्वामी समर्थ इंगळे मठ, असे नामकरण करून त्यामध्ये नित्य, सकाळ संध्याकाळी पूजा अर्चा,ध्यान धारणा,जप, प्रवचन, गुरुचरित्र वाचन, अव्यहतपणे सुरू राहणार असे स्वामीभक्त श्री. सुरेश इंगळे महाराज यांनी सांगितले, मठाच्या उभारणीत असंख्य स्वामी भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले.आज समर्थ प्रकट दिन, श्री. स्वामी समर्थ इंगळे मठ साखरवाडी- मुरूम रोड येथे विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा
स्वामीभक्त....
श्री. रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन.९९७९७४९१७७